Jeevnachya Moulyvan Siddhantaache Saar

· WOW PUBLISHINGS PVT LTD
E-Book
167
Seiten
Bewertungen und Rezensionen werden nicht geprüft  Weitere Informationen

Über dieses E-Book

‘झाडावरून सफरचंद खाली का पडले?’ व ‘झाडावर बसलेल्या चिमणीचे फक्त डोळेच कसे दिसतील?’


हे प्रश्न न्यूटन व अर्जुनच्या मनात आले. या प्रश्नांमुळे एक वैज्ञानिक झाला व एक धनुर्धर झाला. तुमच्या मनातील प्रश्न तुम्हाला घडवतील? म्हणून आता तुम्ही उत्तर शोधण्याऐवजी प्रश्न शोधायला तयार व्हा? 


एकदा एका तरुणाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, की मृत्यूनंतर काय होते? त्याने स्वतःच एखाद्या शवाप्रमाणे जमिनीवर झोपून अनुभव घेतला आणि ‘मी कोण आहे?’ याची प्रचिती आल्यामुळे रमण महर्षी प्रकट झाले. 


किशोरवयीन सिद्धार्थने जेव्हा एक वृद्ध, एक आजारी, एक शव व एक तेजस्वी साधू बघितला तेव्हा त्याच्याही मनात दुःखाबाबत प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नामुळे सिद्धार्थला झटका बसला व तो महालातील सुख- सुविधांचा त्याग करून जंगलात गेला. दुःखमुक्तीच्या मार्गाच्या शोधात, कठोर तपाचे आचरण करून, मध्यम मार्ग स्वीकारून सिद्धार्थ भगवान बुद्ध झाला. 


एकदा राजा जनकांना स्वप्न पडले. स्वप्नात ते निर्धन, भिकारी होऊन दारोदार भटकत होते. वाळवंटात तहानेने कासावीस झाले होते. घाबरून त्यांनी डोळे उघडले तर त्यांच्या लक्षात आले, की ते त्यांच्या महालातील आलिशान शयनगृहात गादीवर झोपले आहेत. त्या वेळी त्यांच्या मनात प्रश्न आला, की झोपेत जे पाहिले ते स्वप्न होते का आता जागेपणी जे पाहत आहे ते स्वप्न आहे? या जिज्ञासेमुळे राजा जनकाचा नव्याने जन्म झाला. 


स्वामी विवेकानंदांना लहानपणापासून प्रश्न पडायचा की ‘कोणी ईश्वराला प्रत्यक्ष पाहिले आहे का?’ जे कोणी साधु-संत भेटायचे, त्यांना ते हाच प्रश्न विचारायचे. नंतर त्यांना संत रामकृष्ण परमहंस भेटले. 


या सर्व उदाहरणांचे सार हेच आहे, की अशा जिज्ञासांमुळे, प्रश्नांमुळे आध्यात्मिक व भौतिक जगातील गूढ रहस्ये उलगडली गेली व त्यांनी मानवतेच्या विकासात अमूल्य योगदान दिले. आपणही आपल्या जिज्ञासेप्रति जागृत राहायला हवे. जिज्ञासेच्या मुळाशी असलेल्या हिर्‍यापर्यंत पोहोचायला हवे. 


आपणही सनातन व अलख निरंजन होऊन स्वतःच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारायला हवेत.


‘अलख निरंजन’ म्हणजे अशी दृष्टी जिच्याद्वारे अदृश्य, अगोचर अशा परमात्म्याचा, जो पवित्र, निर्मळ आहे व मनापलीकडे आहे त्याचा अनुभव घेणे. तो अदृश्य पण सगळीकडे व्याप्त असा परमात्मा आहे. 


अशा या अदृश्य, असीम, निराकार परमात्म्याला जाणण्याची सुरुवात काही प्रश्नांमुळे होते. असे प्रश्न माणसाच्या मनाला झटका देतात व एका जिज्ञासूला नवीन यात्रेची सुरुवात करण्यास भाग पाडतात. जर तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर हा ग्रंथ त्याचे उत्तर आहे. ही उत्तरे तुमच्या जिज्ञासेला, शोधाला अंतिम टप्पा मिळवून देतील. शरीराला निमित्त बनवून ‘मी कोण आहे?’ या जिज्ञासेला बळ देतील. 


‘मी कोण आहे?’ हा ब्रह्मांडातील एक असा गूढ प्रश्न आहे, जो अनेक महापुरुषांनी विचारला व स्वतःला जाणून ते अमर झाले. त्यांच्या गाथा, जीवनचरित्रे आजही आपल्याला प्रेरणा देतात. हेच आहे योग्य प्रश्नाचे महत्त्व! जीवनात योग्य प्रश्न उत्तरे खेचून आणतात. हा उन्नतीचा संकेत आहे. तो आपल्याला भरकटू देत नाही, गर्दीपासून दूर व कणखर बनवतो. 


आपले आजचे जीवन कसे आहे, यावर जरा विचार करा. सत्याचे ज्ञान प्राप्त करून ते अनमोल व महत्त्वपूर्ण बनले आहे का? का बनण्याच्या मार्गावर आहे? जीवनातील परिस्थितीत कोणते प्रश्न मनात निर्माण होतात? 


एखादे काम करत असताना जर त्यात अडचण आली तर अशा वेळी काय करायला हवे? हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर याचे उत्तर निश्चित मिळते. अशा प्रश्नाचे खूप महत्त्व आहे. असे प्रश्न विचारून उद्दिष्ट ठरवा की, ‘मला याचे उत्तर हवे’ तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की याचे उत्तर कसे मिळते? उत्तर कुठून येते? एखाद्या शरीराद्वारे, पुस्तकाद्वारे की घटनेद्वारे येते? 


ही पद्धत लक्षात आली, की मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तरी त्याचे दुःख तुम्हाला वाटणार नाही. कारण तुम्हाला विश्वास वाटू लागेल, की ‘या गोष्टीला जागृती निर्माण करणारा प्रश्न समजून त्यावर नियतीला (ईश्वर) काम करू द्यायचे आहे.’ ज्याप्रमाणे हिर्‍याची खरी किंमत हिरा तासल्यानंतरच होते, त्याप्रमाणे प्रश्नांवर मनन करून त्याची उत्तरे मिळवून तुम्हीही हिर्‍याप्रमाणेच चमकाल. त्यामुळे तुमचे उच्चतम विकसित रूप जे तुम्ही मनात जोपासले आहे, ते प्रगट होईल. 


या ग्रंथांमध्ये अशाच काही प्रश्नांची उत्तरे म्हणजे त्याचे सार दिले आहे, किंवा असे समजा, की थोडक्यात ती समजावून सांगितली आहेत, परंतु ही अशी उत्तरे आहेत, ज्यांच्यात आपले जीवन प्रकाशमान करण्याची क्षमता आहे. फक्त त्यावर योग्य दिशेने मनन करणे आवश्यक आहे. हीच आहे प्रश्नांची जागृती.... व आपल्या प्रश्नांचा शोध. 

Autoren-Profil

सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचं अध्ययन केलं. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केलं. जीवनाचं रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपलं शोधकार्य सातत्याने सुरू ठेवलं. या शोधातूनच त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवलं, की अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे ‘समज’(Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचं कार्य थांबवलं आणि जवळ जवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपलं समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केलं.  


सरश्री म्हणतात, ‘‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा प्रारंभ जरी वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या ‘समजे’चं श्रवणच पुरेसं आहे.’’ ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचनं दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणार्‍या या समजेचा लाभ घेऊ शकतो. 


ही समज प्रत्येकाला आपल्या अनुभवातून प्राप्त व्हावी, यासाठी सरश्रींनी ‘महाआसमानी परमज्ञान शिबिर’ आणि त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली (सिस्टिम) तयार केली. तिचा लाभ आज लाखो लोक घेत आहेत. या प्रणालीला आय.एस.ओ. (ISO 9001:2015) प्रमाणपत्रही लाभलंय. या प्रणालीमुळेच अनेकांना सत्यमार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या समजेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘तेजज्ञान फाउंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचा पाया रचला. ‘हॅपी थॉट्सद्वारे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती करणे,’ हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. 


विश्वातील प्रत्येक मनुष्य आज सरश्रींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचं बंधन नसतं. विश्वाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यांतील लोक आज ‘तेजज्ञान’च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा (System for Wisdom) लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.


बेस्ट सेलर पुस्तक ‘विचार नियम’ शृंखलेचे रचनाकार म्हणूनही सरश्रींना ओळखलं जातं. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत या पुस्तकाच्या 1 कोटीपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. याशिवाय आजवर त्यांनी विविध विषयांवर 150 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी ‘विचार नियम’, ‘स्वसंवाद एक जादू’, ‘शोध स्वतःचा’, ‘स्वीकाराची जादू’, ‘निर्णय आणि जबाबदारी’, ‘निःशब्द संवाद एक जादू’, ‘संपूर्ण ध्यान’ इत्यादी पुस्तकं बेस्ट सेलर झाली आहेत. ही पुस्तकं दहापेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित असून, पेंगुइन बुक्स, हे हाउस पब्लिशर्स, जैको बुक्स, मंजुळ पब्लिशिंग हाउस, प्रभात प्रकाशन, राजपाल अ‍ॅण्ड सन्स, पेंटागॉन प्रेस आणि सकाळ प्रकाशन इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारे ती प्रकाशित झाली आहेत. 

Dieses E-Book bewerten

Deine Meinung ist gefragt!

Informationen zum Lesen

Smartphones und Tablets
Nachdem du die Google Play Bücher App für Android und iPad/iPhone installiert hast, wird diese automatisch mit deinem Konto synchronisiert, sodass du auch unterwegs online und offline lesen kannst.
Laptops und Computer
Im Webbrowser auf deinem Computer kannst du dir Hörbucher anhören, die du bei Google Play gekauft hast.
E-Reader und andere Geräte
Wenn du Bücher auf E-Ink-Geräten lesen möchtest, beispielsweise auf einem Kobo eReader, lade eine Datei herunter und übertrage sie auf dein Gerät. Eine ausführliche Anleitung zum Übertragen der Dateien auf unterstützte E-Reader findest du in der Hilfe.